Posts

मैत्रीची परतफेड

  मैत्रीची परतफेड एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली. प्रत्यक्षात भागवतात असल्याचे मला आठवत नाही. पण वाचताना मित्रप्रेमाची साक्ष देणारी वाटली. ती माझ्या शब्दात लिहून काढली इतकच! एकदा महर्षी विश्वामित्र ऋषी सांदिपनींच्या आश्रमात आले. त्याचवेळी आश्रमातले शिष्य फळ-कंदमुळं गोळा करायला वनात गेले होते. कृष्ण आणि सुदामाही बाकी शिष्यांसोबत वनात गेले होते. महर्षींचं स्वागत करायला आश्रमात पाणी आणि आसनाशिवाय बाकी काहीच सामग्री नव्हती. सांदिपनींनी विश्वामित्रांना पाय धुवायला पाणी आणि बसायला आसन दिलं. आपले शिष्य थोड्याच वेळात रानातून   ताजी फळं, कंदमुळं व रानमेवा घेऊन येतील तोवर थोडा विश्राम करावा; त्यानंतर आपला श्रमपरिहार होण्यासाठी लगेचच ताजा रानमेवा मिळेल अ‍से सांगून   आपण लगेचच काही खायला देऊ शकत नाही ह्या बद्दल विश्वामित्रांकडे दिलगिरी व्यक्त केली. पण विश्वामित्रच ते! आसन ग्रहण करत विश्वामित्रांनी ध्यान लावलं असता सांदिपनींच्या पत्नीने कृष्णासाठी मुठभर पोहे जपून वेगळे ठेवले असल्याचं त्यांना लक्षात आलं. महर्षींना संताप आला आणि म्हणाले, ‘‘ठिक आहे. तुमच्याकडे जे मूठभर पोहे जपून...

‘‘ त्रिपिडाऽस्तु दिने दिने! ’’

  ‘‘ त्रिपिडाऽस्तु दिने दिने ! ’’ एक दिवस भोजराजाच्या दरबारात एक माणूस   काही तरी भलताच आशीर्वाद घोकत राजापर्यंत पोचला . राजाला नमस्कार करून त्याने ‘‘ राजन् त्रिपिडाऽस्तु दिने दिने ! ’’ हा आपला आशीर्वाद मोठ्याने म्हटला . दिने दिने म्हणजे प्रत्येक दिवशी ! दररोज ! त्रि म्हणजे तीन . पीडा म्हणजे क्लेश , दुःख , यातना . ‘‘हे राजा रोज तुला तीन तीन प्रकारच्या पीडा असोत . ’’ राजाला चांगला शुभ आशीर्वाद द्यायच्या ऐवजी हा काय अवलक्षणी आशीर्वाद ! सारा दरबार राजा आता काय करतो हे घाबरून बघतच राहिला . राजानेही अत्यंत रागावून त्या माणसाला बंदी बनवून तुरुंगात टाकायची आज्ञा दिली . तो माणूस गरीब दिसत होता . त्याला आपण काय गुन्हा केला हेही कळलं नसावं . कदाचित त्याला कोणीतरी असा आशीर्वाद दे असं पढवलेलंही असावं .   पण ! तो माणूस अपराधी वाटत नाही हे कालिदासाच्या सराईत डोळ्यांना लगेचच उमगलं . अशा गरीबाला हकनाक शिक्षा होऊ नये म्हणून कालिदास लगेचच पुढे आला आणि राजाला म्हणाला , ...